इंदापूर शहरात नगरपालिकेच्या राजकीय पटलावर कोण होणार वजीर ? हे तिसरी आघाडी ठरवणार?

इंदापूर प्रतिनिधी विशेष राजकीय वृत्त शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.२७: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे महाराष्ट्रभर वाहू लागले आहे.इंदापूर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

इंदापूर शहरात अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.यामध्ये प्रमुख राष्ट्रीय पक्ष, काही राज्य पक्ष,स्थानिक पातळीवर आघाड्या , तर काही अपक्ष आपले नशीब आजमावण्यासाठी धडपडत आहेत.इंदापूर शहरात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,बहुजन समाज पार्टी ,शिवसेना, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, आर.पी.आय (आठवले गट व निकाळजे गट), भीमशक्ती, मनसे, आप, आदी पक्ष आप आपल्या शक्ती प्रमाणे कार्यरत आहे.इंदापूर नगरपालिकेत असणारे दोन्ही प्रमुख असणारे राष्ट्रीय पक्ष आप आपल्या तयारीला लागले आहेत.परंतु दोन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. कारण एका पक्षाचे ९ तर एका पक्षाचे ८ उमेदवार आज नगरपालिकेत कार्यरत आहेत.

इंदापूर शहरात विद्यमान नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा या जनतेतून नगराध्यक्षा झालेल्या होत्या. यांच्या कार्यकाळात इंदापूरकर समाधानी असल्याचे दिसून आले.कारण त्यांच्या कार्य काळात नागरिकांना  वीज , स्वच्छता व पाण्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले नाही. तसेच इंदापूर शहराला प्रगतीच्या दिशेने घेऊन गेले. इंदापूर शहराला राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता अभियानात बक्षीस प्राप्त करून दिले व शहराचा कायापालट केला. पूर्वीचे इंदापूर आणि आताचे इंदापूर असे पाहता इंदापूर शहरात सौ.अंकिताताई शहा यांनी बरीच प्रगती घडवून आणली.

इंदापूर शहरात काही राजकीय  पक्षात गटा तटाचे राजकारण चालू आहे.प्रत्यक्ष वरून एकत्र जरी दिसून येत असले तरी अंतर्गत कलह उफाळून आलेला दिसून येत आहे. त्यामुळे  गटातील आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक , निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहे. जे नगरसेवक जनतेने निवडून दिले ते पुन्हा जनतेचे काम करताना दिसले नाहीत. तर ज्या नगरसेवकांनी आपल्या वार्ड मध्ये कामे केलेली आहेत.जनता त्यांच्याच पाठीशी असणार आहेत. ज्या नगरसेवकांनी उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना जनता नक्कीच नाकारणार आहे.

दर पंचवार्षिक निवडणुकांना अनेकजण आपला पॅनल उभा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अजून तरी असा एकही पॅनल स्वतंत्र निवडणूक लढवू शकला नाही.परंतु यंदाच्या निवडणुकीत नगरपालिकेत असलेल्या अनेक पक्षा- अंतर्गत असलेल्या दुफळीमुळे इंदापूर शहरात प्रसिद्ध, दानशूर, युवकांचे प्रेरणा स्थान, ज्यांच्याकडे संपूर्ण शहर आदर व सन्मानाने पाहते, अश्या जाणत्या नेतृत्वाकडून तिसरा पॅनल उभा राहणार असल्याची चर्चा साऱ्या इंदापूर शहरात आहे.

हा तिसरा पॅनल सत्तेची समीकरण बदलणारा असेल. त्यामुळे जनता नेमकी कोणाला आपल्या सेवेसाठी पुन्हा सत्तेवर पाचारण करतेय हे आपल्याला निकालातून दिसून येईल.तिसऱ्या पॅनलच्या संपर्कात अनेक दिग्गज नेते असून त्यांचा कल राष्ट्रीय पक्षांपेक्षा या पॅनलकडे असलेला दिसून येत आहे. सध्या हा पॅनल अस्तित्वात नसला तरी या पॅनेलची चर्चा मात्र इंदापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालू आहे.या दृष्टीने पॅनेलची चाचपणी सुरू झाली असल्याचे कळत आहे.हे दानशूर,दयावान नेतृत्व नेहमी सढळ हाताने गरीब असो अथवा श्रीमंत मदत करत असते.दवाखाना असो, सामाजिक असो, अगदी राजकीय विषय सहजतेने हाताळतात.यामुळे संपूर्ण इंदापूर शहराचे लक्ष आगामी निवडणुकीकडे लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!