उजनी धरण उणे जाण्याची शक्यता! नागरिकांनी पाणी जपून वापरावे- नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा अपव्यय होत असल्यास टाळावा असे आव्हान इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा यांनी इंदापूर शहरातील नागरिकांना केले.
मान्सून लवकर येणार असे म्हणता म्हणता तो अधिकच लांबणीवर पडत चालला असल्याचे दिसून येत आहे. त्यातच उजनी जलाशयावर मराठवाड्यातील काही भाग , पुणे , सोलापूर, दौंड, इंदापूर, सांगोला, पंढरपूर, बारामती अशी अनेक गावे उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे उजनी धरणात उपयुक्त साठा थोडाच शिल्लक आहे. त्यातच शेती , कारखानदारी, पिण्याचे पाणी , विद्युत निर्मिती अश्या कारणांसाठी पाण्याचा उपयोग केला जातो.त्यामुळे बराचसा प्रदेश उजनीच्या अध्यापत्याखाली येत असल्याने पाणी प्रश्न बिकट होत आहे.पाण्याचे बाष्पीभवन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होते.
त्यामुळे सौ. शहा यांनी पाण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाणी जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे पाणी जपून वापरावे असे त्यांनी आव्हान केले आहे.