नाभिक समाजाने हिंदू मुस्लिम वादात पडण्यापेक्षा शिक्षण घेऊन सर्वोच्च पदे मिळवावीत – शिवशाहीर निलेश जगताप
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.१ : शूरवीर शिवा काशिद ३९२ वी जयंती महोत्सव महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
तसेच वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक इंदापूर शहरातून काढण्यात आली होती. ठीक ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कल्याणराव दळे प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र नाभिक महामंडळ) कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा, कार्यक्रमाचे प्रमुख शिवशाहीर निलेश जगताप,श्री.दामोदर बिडवे (राज्य कार्याध्यक्ष), श्री. सतिश कसबे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवशाहीर निलेश जगताप म्हणाले की, वीर शिवा काशिद यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. शिवा काशिद यांचा इतिहास लिखित स्वरूपात किंवा पुस्तकाच्या स्वरूपात जगासमोर आणणे गरजेचे आहे. नाभिक समाजाने आपल्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांनी आपला विकास करणे गरजेचे आहे.शिक्षणामुळे आपणाला बहुजन महापुरुषांची नाळ ही एकच आहे. हिंदू मुस्लिम बांधवांनी व नाभिक समाजाने धार्मिक वादात अडकण्यापेक्षा आपल्या हाती पेन घेऊन शिक्षण घ्यावे आणि सर्वोच्च पदे प्राप्त करावी,असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी आप-आपली मते मांडली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कल्याणराव दळे प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र नाभिक महामंडळ), कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवशाहीर निलेश जगताप,श्री.दामोदर बिडवे (राज्य कार्याध्यक्ष), श्री. सतिश कसबे, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. मुकुंद शहा , मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मा. नगरसेवक धनंजय बाब्रस ,महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष रमेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच हमीद आतार, बापू दळवी, प्रा.कृष्णा ताटे, बाळासाहेब ढवळे ,रमेश शिंदे, युवराज पोळ,नगरसेवक प्रशांत शिताफ, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, ललेंद्र शिंदे, शंकर काशिद, हे ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
तर या कार्यक्रमाचे आयोजन समस्त नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले होते.
तर या कार्यक्रमाला संतोष क्षीरसागर, प्रवीण राऊत, गणेश राऊत, अवधूत पवार, रमेश राऊत, श्याम वाघमारे,सदाशिव दळवी, कपिल राऊत, अजय साळुंखे, आनंद जाधव, उमेश क्षीरसागर, विजय क्षीरसागर, श्री गाडेकर, श्री शिंदे आदी समाज बांधव उपस्थित होते. व हा कार्यक्रम वरील कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश राऊत यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप अवधूत पवार यांनी केले.