यंदा इंदापूर तालुक्यात तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम पाच दिवस तर इंदापूर शहरातील पालखी मुक्काम ठिकाण नेमके कोणते कळीचा मुद्दा ठरणार?

यावेळेस पालखी कोठे थांबेल ?

हा मात्र यंदा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण अनेक वर्ष झाली पालखी मुक्काम ठिकाण श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथे असतो. परंतु इंदापूर आय. टी .आय. या शासकीय ठिकाणी मुक्काम करणार असल्याचे बोलले जात आहे.तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांनी देहू संस्थानाकडे याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. व पालखी  पुर्वतत ठिकाणी रहावी आणि अखंडीत परंपरा खंडित करू नये असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आल्याचे समजत आहे.

तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे याबाबत काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण शासकीय औदोयोगिक प्रशिक्षण केंद्रात पालखी तळ भव्य दिव्य बांधण्यात आले आहे.

 

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.: १९ : कोरोना महामारीत श्री.संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी यांची गेली दोन वर्ष प्रस्थान झाली नव्हती. त्यामुळे वारकरी संप्रदायात कमालीची अस्वस्थता होती. पांडुरंगाच्या ओढीने यंदा अफाट अलोट भक्ती सागर ओसंडून वाहणार आहे.

त्यामुळे वारकऱ्यांची संख्या व दिंडीची संख्या वाढणार आहे.

अंदाजे वारी सोबत ६ लाख वारकरी येण्याची दाट शक्यता आहे.रविवार दि.१० जून २०२२ रोजी पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटात विशालकाय महा सोहळा पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.यामुळे महाराष्ट्र शासनाला सुरक्षा व्यवस्थेचा अतिरिक्त ताण पडणार आहे. श्री क्षेत्र देहू ते श्री. क्षेत्र पंढरपूर हा वारी सोहळा दि २० जून २०२२ रोजी इनामदार वाडा देहुतून प्रस्थान करणार आहे.

हा पालखी सोहळा दि. २९ जुन२०२२ इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे.श्री.संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यातील मुक्काम वाढला आहे. त्यामुळे इंदापूर करांना भक्ती सेवा करण्याचे भाग्य लाभणार आहे. यंदा इंदापूर तालुक्यातील वारीचा मुक्काम व थांबा सहा दिवस आहे.बेलवाडी येथे पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे.तेथून पालखी सणसर येथे २९रोजी मुक्काम करणार आहे.पहिला मुक्काम सणसर येथे होणार आहे.

त्यानंतर दि.३० रोजी पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे होणार आहे.त्यानंतर पालखी लासूर्णे जंक्शन या ठिकाणांहून मार्गस्थ होऊन अंथूर्णे येथे पालखी येथे मुक्कामास थांबेल.दि.०१जुलै रोजी पालखी सकाळी अंथूर्णे येथून पुढील प्रवासास निघेल.शेळगाव,चौपन फाटा, गोतोंडे या गावावरून निमगाव केतकी येथे पालखी विश्रांती घेऊन दि ०२ जुलै रोजी पालखी इंदापूरकडे मार्गस्थ होईल.

दि.०२ पालखी तरंगवाडी कॅनोल, गोखळी, मार्गे इंदापुर शहरात दाखल होईल यानंतर दुसरे गोल रिंगण सोहळा सौ.कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय येथे पार पडेल पालखी मुक्काम स्थाना कडे प्रस्थान करेल. पालखी इंदापूर शहरात दोन दिवस मुक्काम करेल.

यावेळेस पालखी कोठे थांबेल ?

हा मात्र यंदा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण अनेक वर्ष झाली पालखी मुक्काम ठिकाण श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथे असतो. परंतु इंदापूर आय. टी .आय. या शासकीय ठिकाणी मुक्काम करणार असल्याचे बोलले जात आहे.तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांनी देहू संस्थानाकडे याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. व पुर्वतत ठिकाणी रहावी अखंडीत परंपरा खंडित करू नये असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आल्याचे समजत आहे.

तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे याबाबत काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण शासकीय औदोयोगिक प्रशिक्षण केंद्रात पालखी तळ भव्य दिव्य बांधण्यात आले आहे

दि.०४ जुलै रोजी पालखी वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, मार्गे सराटी मुक्कामासाठी थांबेल.आणि दि.०५ रोजी पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज गावात प्रवेश करेल.

 रविवारी ०९ जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल आणि १० जुलै रोजी आषाढी एकादशी निम्मित पंढरीत विठुरायाचा गजर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!