शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे  यांचे बंडखोर आमदार मंत्री गुलाबराव पाटील  यांच्या धरणगावात पुष्पवृष्टीसह जोरदार स्वागत

जळगाव : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे  यांचे बंडखोर आमदार मंत्री गुलाबराव पाटील  यांच्या धरणगावात जोरदार स्वागत झाले.

आदित्य ठाकरे सध्या शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा करत आहेत. ते आज जळगावच्या दौऱ्यावर होते. जळगावमध्ये आदित्य यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

शिंदे गटात सहभागी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात आदित्य ठाकरे यांचे प्रचंड जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळाले. जिकडे दिसेल तिकडे इमारतींच्या छतावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिसत होते. त्यामुळे हा दौरा गुलाबरावपाटलांचे टेन्शन वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे.या वेळी आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते. मात्र, यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली असा घनाघातही त्यांनी केला. जिथे आहे तिथे आनंदाने राहा. मात्र, थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचे घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्र सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला एकटे पडून देऊ नका, आम्हाला सांभाळून घ्या असे भावनिक आवाहन त्यांनी केले. ३३ देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. राज्याचे मुख्यमंत्री हे ‘तात्पुरते’ मुख्यमंत्री आहेत, अशी टिकाही त्यांनी केली. हे सरकार म्हणजे गद्दारांच सरकार आहे बेईमानांच सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असेही आदित्य म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!