दर ८तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या – आजमितीला या नऊ महिन्यात १ हजार ४७८ आत्महत्या.
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क इंदापूर
दि.१६ इंदापुर /सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा करीत असले तरी यावर्षीच्या नऊ महिन्यांत १ हजार ४७८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव चित्रण आहे.
सन २०२२ मध्ये नऊ महिन्यात १ हजार ४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्य मंत्री असताना देखील सतत शेतकरी दररोज आपला जीवन क्रम कर्जाला दुष्काळाला, कंटाळून संपवत आहे. शिंदे सरकार देखील शेतकरी आत्महत्या रोकु शकत नाही.यामुळे हे सरकार देखील अपयशी ठरले असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.पश्चिम विदर्भात ८१७ तर मराठवाड्यात ६६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.
राज्यात दर ८ तासाला एक शेतकरी आत्महत्या करीत आहे.मात्र मदतीच्या निकषात १६ वर्षानंतरही बदल नाहीत.शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी मृताच्या वारसास फक्त ३० हजार रुपये धनादेश दिला जातो तर ७० हजार रुपये मासिक बचत योजेनेत मुदत ठेव ठवली जाते.
यामध्ये पश्चिम विदर्भात ८१७, तर मराठवाड्यात ६६१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा आलेख व चिंता वाढली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात सन २०२१ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत १८,४८२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ८,५२३ प्रकरणात शासन मदत देण्यात आली. त्यापेक्षा जास्त ९,७८१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. अद्याप ३७९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
याशिवाय विविध कारणांनी अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.