ताज्या घडामोडी

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा; आचारसंहिता लागू

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर —

काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या घोषणेसह राज्यभर निवडणुकीची आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.

राज्यातील या निवडणुका येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा करताना सांगितले की, एकूण २४६ नगर परिषदांमध्ये आणि ४२ नगर पंचायतींमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये १० नवीन नगर परिषद आणि १५ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींचा समावेश आहे.

निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) पार पाडल्या जाणार असून एकूण १ कोटी ७ लाख ३० हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगर परिषदेच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीने होतील आणि २८८ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक वार्डमध्ये दोन ते तीन जागांसाठी निवडणूक होईल.

निवडणुकीचा कार्यक्रम:

 दाखल : १० नोव्हेंबर २०२५

अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर २०२५

छाननी : १८ नोव्हेंबर २०२५

माघारी घेण्याची मुदत : २५ नोव्हेंबर २०२५

निवडणूक चिन्ह वाटप : २६ नोव्हेंबर २०२५

मतदान : २ डिसेंबर २०२५

मतमोजणी : ३ डिसेंबर २०२५सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेचा शुभारंभ केला आहे.

आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय रंगत चढणार असून स्थानिक विकासाच्या मुद्यांवर मतदार आणि उमेदवार आमनेसामने येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!