अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केल्या गंभीर स्वरूपाच्या टीका अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटील काय देणार उत्तर?
इंदापूर (प्रतिनिधी) : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या यादी जाहीर झाल्यानंतर आता उमदेवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. त्यामुळे, मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांच्या सभाही सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना आल्यानंतर अजित पवारांनी थेट हर्षवर्धन पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापेक्षा आपले संबंध अधिक जवळचे असल्याचे सांगितले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
मी जिल्हा सांभाळत होतो, सत्तेत असताना तुम्हाला फक्त इंदापूर सांभाळू शकला नाही. कर्मयोगी कारखाना जर दुसऱ्याच्या ताब्यात नाही गेला, तर त्या कारखान्याची वाटोळे आहे. त्यात, आपल्याला लक्ष घालावे लागेल. उजनीच्या बॅकवॉटरमध्ये एक मोठा प्रकल्प करतो आहे. मी तर कलेक्टरशी बोललोय, मी मंजूरही केले असून फक्त टेंडर काढायचं बाकी आहे, असे म्हणत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
इंदापूरला पाणी कुठून आणायचं कसं आणायचं त्याची जबाबदारी माझी. माझं आणि देवेंद्रांचं बोलणं झालंय. काँग्रेसवाल्यांनी जेवढी तरतूद केली नाही, तेवढी आम्ही अल्पसंख्याक लोकांसाठी तरतूद केलीय. लोकांच्या भुलथापांना बळी पडू नका, हे खोटं बोलतात महाराष्ट्रचं गुजरातला गेल्याचं सांगतात. पण, महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिला क्रमांकावर आहे.
अजित पवारांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. अमित शहा यांच्याकडे मी गेल्यावर काम होईल, का हा बाबा गेल्यावर काम होईल? असे म्हणत अमित शाह यांच्याशी आपली जवळीक असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. तसेच, अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का? असा खोचक सवालही अजित पवारांनी विचारत हर्षवर्धन पाटील यांना लक्ष्य केलंय.अजित पवारांनी हर्षवर्धन पाटीलांवर चौफेर टिका केली.
पुढे अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या भेटीबाबत सांगितले. अजित पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील आणि मी सागर बंगल्यावर बसलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आता तुम्ही सगळ्यांनी काम करा आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. तेव्हा हर्षवर्धन पाटील म्हणाले आमदारकीचं काय, मी म्हटलं आमदारकीच्या संदर्भात मी काय निर्णय घेणार नाही. त्यानंतर ते म्हटले देवेंद्र फडणवीस जे म्हणतील ते मान्य असेल, त्यानंतर मी हो म्हटलं हर्षवर्धन पाटील सुद्धा हो म्हणाले. निवडणुका जवळ आल्यावर त्यामध्ये विधानपरिषदेच्या १२ जागा भरायच्या होत्या, त्यातील सात जागा आता भरल्या पाच जागा राहिल्या. परंतु त्याची थांबायची तयारी नव्हती. सारखं आपण कसं आपण थांबून कसं चालेल. त्यानंतर भाजप पण सोडून दिला आणि आता शरद पवारांच्या पक्षात गेले. सारखं दलबदलूपणा तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल,” असा टोला देखील अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला.
पुढे अजित पवार म्हणाले की, “हर्षवर्धन पाटलांनी राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले त्याचे काय केले. सगळं गोड गोड बोलून आमच्याकडून अमित शहांकडून मंजूर करून घेतलं आणि सोयीचे आले की गेले निघून. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आमचा खानदानाला घरी नेल्यावर जेवायला घातला आणि अदृश्य प्रचार केला. ही लोक कोणाचीच नाही. अजित पवारने असं आयुष्यात कधी केलं नाही. जो कोणी उभा राहील त्याचा एक इमाने ईदबारी प्रचार केला. अमित शहा यांच्याकडे मी गेल्यावर काम होईल, का हा बाबा गेल्यावर काम होईल? अमित शाह याला दारात तरी उभं करतील का?” असे म्हणत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताना आमचा अदृश्य हात होता असे विधान नुकतेच केले. त्याचा समाचार अजितदादांनी घेतला. अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर जहरी टीका केली.
त्यांनी (हर्षवर्धन पाटील) आम्हाला लोकसभा निवडणुकीत आश्वासने दिली. त्यांच्या घरी आम्हाला बोलावले. जेवू घातले, पण प्रत्यक्षात अदृश्य हात ‘तुतारी’साठी वापरला, असे तुम्ही म्हणत असाल, तर ही गोष्ट कोणत्या नैतिकेत बसते? ज्या पक्षांमध्ये आपण असतो त्या पक्षाचेही आपण काम करीत नाही. अशा दलबदलू नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल अजित पवार यांनी केला. इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.