देशाला फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच विचार वाचवू शकतात – जिल्हाध्यक्ष राजकुमार

इंदापूर (प्रतिनिधी):वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, पुणे जिल्हा प्रभारी प्रा.किसन चव्हाण सर यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत इंदापूर शहर “दर्गाह मस्जिद चौक” ता. इंदापुर जि. पुणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब यांच्या हस्ते (दि.०४) मार्च रोजी सायंकाळी ठिक ०८.००वाजता करण्यात आले.त्तपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातील मुख्य बाजारपेठ मधून हलग्यांच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिष बाजी करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.

इंदापूरातील दर्गाह मस्जिद चौका मध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा फलकाचा अनावरनाचा कार्यक्रम पार पडला.या सभेच्या ठिकाणी बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन सभेला सुरूवात करण्यात आली.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी सर्वप्रथम आंबेडकर घराणेच मदतीला धावून येत असते. येणाऱ्या निवडणुकामध्ये बहुजन समाजाने सतर्क राहून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे व श्रद्धेय अँड प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात बळकट करावे .सर्व वंचित मिळून आपण शासनकर्ती जमात बनणे हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे.या देशावर आंबेडकर घराण्याचे फार उपकार आहेत.

वंचित बरोबर राहिले स्वाभिमान टिकून राहील. प्रकाश आंबेडकरांनी वंचित घटकाला सोबत राहून सत्तेसाठी लढत आहेत. आंबेडकर हे फक्त जनतेसाठी लढत आहे.देशाचा राजा मतदार पेटीतून जन्माला घालण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे.या देशासाठी बाबासाहेबांनी खूप मोठा त्याग केला.बाबासाहेबांनी स्वतःची 4 मुले गमावली.चांगले दिवस पाहायचे असतील तर संघर्ष करावा लागेल

असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब यांनी केले.तसेच शाखेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.

शहराध्यक्ष सुभाष खरे यांनी दिमाखदार पद्धतीने इंदापूर शहरात शाखा उघडल्या आहेत असे जिल्हा कमिटीने म्हटले आहे.

या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा महासचिव सतिशजी साळवे, उपाध्यक्ष सचिन साबळे , सचिव गोविंद कांबळे, संघटक प्रबोधनकार सुधाकर अभंग सर, संतोषजी मिसाळ, इंदापूर तालुकाध्यक्ष मनोज साबळे, उपाध्यक्ष गणेश पारधे, रमजान सय्यद, संघटक श्यामराव जाधव, इंदापूर शहर उपाध्यक्ष किर्ती कुमार वाघमारे, सहसचिव राहुल गुंजवटे, संघटक सिद्धांत खरे, आशुतोष मखरे, अण्णा साबळे, जिल्हा युवक संघटक रोहित माने, इंदापूर तालुका युवक महासचिव सोमनाथ खानेवाले सर,विशाल सोनवणे, शेळगाव शाखाध्यक्ष बाजीराव कदम, बावडा शाखाध्यक्ष विशाल कांबळे, सागर कांबळे, आनंद सरवदे, सुयश कांबळे, गणेश कांबळे, (पत्रकार) भारत सावंत, दीपक मिसाळ, अतुल घोडके, निर बाळासाहेब खरात, बिभीषन कांबळे, तुषार हेगडे, छगन खरात, मयूर लोंढे, पप्पू जावीर इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर वजीर सय्यद, जुनेद सय्यद, शहेबाजखान पठाण, आयान बागवान, साहिल सय्यद,फरहान मोमीन, जुनेद मोमीन, इम्रान मोमीन, किरण मखरे, उमेश मखरे यांनी परिश्रम घेतले.

कीर्तीकुमार वाघमारे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!