कर्मयोगी व निरा – भिमा सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकरी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
शेवटचा २०० रु. चा हप्ता जाहीर तर कर्मचाऱ्यांना १ पगार बोनस म्हणून जाहीर!
इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर येथील भाग्यश्री बंगल्यावर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत दिवाळीच्या पाश्वभूमीवर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून शेवटचा २०० रुपये हप्ता पर टना प्रमाणे जमा होणार आहे तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांना १ पगार बोनस देण्यात येणार असल्याचे सर्व संचालक मंडळांनी पत्रकार परिषेदत जाहिर केले.
सालाबादप्रमाणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केल्या गेल्या असल्याचे त्यांनी जाहिर केले. यामध्ये निवडणूकीची पाश्वभूमी डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केलेच्या नाही त त्यामुळे यामध्ये कुठलेही आधार संहितेचे उल्लंघन केलेले नाही असेही त्यांनी या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केले.पुढे ते म्हणाले की, विरोधक दोन्ही कारखान्यांची बदनामी केली जात आहे.कारखान्याचे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न १ तारखेला केले जातात. विरोधकांनी सहकारी संस्थाची बदनामी विनाकारण करू नका असेही त्यांनी विरोधकांना सुचिवले.सर्व संस्था अतिशय चांगल्या चालत आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संस्था सुरळीत कामकाज करीत आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्ही दरवर्षी प्रमाणे वार्षिक सर्वसाधरण सभा घेत असतो. पण छत्रपती सहकारी साखर कारखान्याची १० वर्ष निवडणुक नाही तसेच २ वर्ष वार्षिक सर्व साधरण सभा झाली नाही. तुम्ही हा प्रश्न जनतेसमोर का मांडत नाही?असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. विरोधकांनी २ कारखाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.तुमच्याकडे अडीच वर्ष मंत्री पद असताना तुम्ही दुग्ध विकास मंत्री होता तेव्हा साधी छोटीशी डेरी देखील काढली नाही मग आमचा दुधसंघ अडचणीत आणण्याच्या प्रयत्न करत आहे .सर्व संस्था अतिशय चांगल्या चालत आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संस्था सुरळीत कामकाज करीत आहे.
राजवर्धन पाटील, विलास बापू वाघमोडे , लालासो पवार सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.