संविधानाने सर्वांना सर्वोच्च पदापर्यंत जाण्याची तसेच समान विकासाची संधी निर्माण केलली.. डॉ.प्रतापसिंह साळुंके

इंदापूर (प्रतिनिधी):भारतीय संविधानाने देशातील सर्वांना राजभवनपासून ते देशातील सर्वोच्च घटना पदापर्यंत जाण्याची तसेच समान विकासाची संधी निर्माण करून दिली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असल्याची माहिती महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलसचिव प्रसिद्ध वक्तेॲड.प्रा.डाॅ.प्रतापसिंह साळुंके यांनी केले.

    इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने १५ व्या वर्षातील मालोजीराजे व्याखानमालेत “संविधानातील मौनाची भाषांतरे”या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे,उज्वला राऊत,मनोज मोरे ,माधवी सोननीस,जयंत नायकुडे,विकास खिलारे,अमर गाडे,उपस्थित होते.

     यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की जगातील सर्व पंथ, धर्म, जाती भारतात आहेत.संविधानातील समाजवाद व धर्मनिरपेक्ष या समान धाग्यामुळे लोकांचे आयुष्य पूर्णांशाने बदलून गेले आहे. संविधानातील मौन समजून घेताना जे शब्द लिहिलेले नाहीत ते सामाजिक अंगाने आत्मीयतेने समजून घेतले पाहिजे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मौनाची भाषांतरे समजून घेताना उद्देशिकेतील आम्ही भारताचे लोक म्हणजे आजचेही लोक सहभागी आहोत हे समजून घेणे आवश्यक आहे. सामाजिक व आर्थिक न्याय असेल तरच राजकीय न्यायाची स्वप्ने आपण पाहू शकतो. पाकिस्तान, म्यानमार,नेपाळ, श्रीलंका येथील नागरिकांना त्यांचे प्रतिबिंब संविधानात दिसत नाही म्हणून ते संविधान सर्वमान्य झाले नाही.परंतू भारतीय नागरिकांना त्यांचे प्रतिबिंब संविधानात दिसते म्हणून हे संविधान १४० कोटी लोकांना सर्वमान्य वाटते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती की कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ व न्यायपालिका यांचा योग्य अन्वयार्थ राज्यकर्त्यांनी लावून त्याची अंमलबजावणी कोणत्याही प्रकारे प्रतारणा न करता राबववी.

  मालोजीराजे व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम व सुनील गलांडे यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर आभार शरद झोळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत साठे,योगेश गुंडेकर, अमोल खराडे, दत्तराज जामदार,विशाल गलांडे, संदिपान कडवळे,रमेश शिंदे, अमोल साठे, सचिन जगताप,ओम दिपक साळुंखे,ओम जगताप यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!