दत्तात्रय भरणे म्हणजे सुपरमॅन- खासदार सुप्रिया सुळे
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
अजोती (इंदापूर) अक्षय कांबळे
दि. इंदापूर तालुक्यातील ७२ कोटी ३३ लाख रुपयांच्या कामाची उद्घाटने बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व मा.राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखली मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी तालुक्यातील ठीक-ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. दुपारी जाचकवस्ती येथून कार्यक्रमाची सुरुवात झाली.आणि उद्धट येथे खासदार सौ.सुळे यांची पहिली सभा पार पडली त्यानंतर सायं ठीक ७. ००वा. अजोती येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .अजोती गावातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अगदी लहानपणापासून ते थोरापर्यंत सर्व उपस्थित होते. करण्यात आले.त्यानंतर दुसऱ्या सभेला सुरुवात झाली.
यावेळी खासदार सौ.सुळे म्हणाल्या की, दत्तात्रेय भरणे हे सुपरमॅन आहेत.यावेळी जग कोरोनाच्या छायेखाली असताना तालुक्यातील बडे बडे नेतेही घरात असताना मामा तालुक्यात रुग्णांच्या मदतीसाठी धावत होते.
ही दिवाळी आनंदाची व सुख समृद्धीची जावो हीच विनंती
परंतु शुभेच्छा देत असताना जनतेची व शेतकऱ्याची दिवाळी सण साजरा करण्यासारखी परिसथिती राहिली नाही. कारण सततच्या पावसामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ साजरा करावा व सरसकट कर्ज माफी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
किसान इ – पोर्टलमुळे सामान्य शेतकरी शासनाच्या योजना लवकर समजू शकत नाही.कारण काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत तर काहींना ते अजून हाताळता येत नाहीत. केंद्र सरकार यांचे आणि आमचे वैचारिक विरोध आहेत ते काय आमचे शत्रू नाहीत.
यावेळी खासदार सौ.सुळे म्हणाल्या की, दत्तात्रेय भरणे हे सुपरमॅन आहेत.यावेळी जग कोरोनाच्या छायेखाली असताना तालुक्यातील बडे बडे नेतेही घरात असताना मामा तालुक्यात रुग्णांच्या मदतीसाठी धावत होते.
अडीच वर्षात मामाने संधीचे सोने केले आणि हजारो कोटी रुपये मंजूर करून आणले.सुप्रिया सुळे यांनी कालठण येथील सी- प्लॅन रद्द झाला असून तो होणार नाही.उजनी जलाशायावरून विमाने उड्डाण घेणार नाही असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले.तसेच अजोती गावचा हद्दवाढ विषय माझ्या कानावर आल्याने आपण व भरणे मामा स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या विषयावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, उजनी धरणात नव्याने मस्त्याबिज सोडण्याची मागणी ही त्यांनी लवकरच आपण शासनाला कळवू असे सांगितले.यावेळी मा.मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे जोरदार आणि तुफानी भाषण झाले.
मा. प्रदिपदादा गारटकर (अध्यक्ष रा.काँ.पार्टी.जि.),मा. व प्रविणभैय्या माने(मा.सभापती,आ.व.बांध.वि.जि.प.पु.) यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाला मा. हनुमंत काेकाटे( अध्यक्ष, रा.काँ.पा.इं.ता.),मा.अमाेल पाटील,मा.श्रीमंत ढोले,.मा. सचिन सपकळ , मा. शुभम निंबाळकर,आदी उपस्थित होते.तसेच गावातील विविध राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.