रणधुमाळी : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान तर २३ ला निकाल!

नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.१५) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल २३ नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे

१)महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

२)२३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.

३)२३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे.

४)३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.

५) ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असणार आहे. आजपासून ३५ दिवसांनी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. नांदेडमध्ये ६)पोटनिवडणूकीसाठी २० नोव्हेंबरलाच मतदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!